कोल्हापूर न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारत आता ऑपरेशन गगन यान ची तयारी करत आहे असे आश्वासक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण समारंभात काढले .नरेंद्र मोदी यांचे भाषण आत्मविश्वास आणि जोष यांनी परिपूर्ण होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी एक संकल्प केला आहे, यासाठी मला देशवासीयांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. कारण कितीही समृद्धी असली तरी, जर ती सुरक्षिततेसह नसेल तर तिचे काही मूल्य नाही. मी लाल किल्ल्यावरून सांगत आहे की येत्या १० वर्षांत, म्हणजे २०३५ पर्यंत, देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना म्हणजे रुग्णालये, रेल्वे, श्रद्धा केंद्रे यासारख्या, नवीन तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण सुरक्षा कवच दिले जाईल. हे सुरक्षा कवच सतत विस्तारत राहील. देशातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटले पाहिजे, कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान आले तरी, आपले तंत्रज्ञान त्याचा सामना करण्यास सक्षम असले पाहिजे. मी २०३५ पर्यंत यासाठी राष्ट्रीय ढाल वाढवू इच्छितो. आपण भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचा मार्ग निवडला आहे. जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू होते, तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्यप्रकाश थांबवला होता आणि दिवसा अंधार केला होता. त्यानंतर अर्जुन जयद्रथाला मारण्याची घेतलेली शपथ पूर्ण करू शकला, हे सुदर्शन चक्रामुळे घडले. आता देश मिशन सुदर्शन चक्र सुरू करणार आहे. हे सुदर्शन चक्र एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली आहे जी केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करणार नाही तर अनेक पटींनी वेगाने प्रत्युत्तर देखील देईल. आम्ही मिशन सुदर्शन चक्रासाठी काही मूलभूत गोष्टी देखील ठरवल्या आहेत, आम्हाला ते १० वर्षांत पूर्ण वेगाने पुढे नेायचे आहे. त्याच्या निर्मितीपासून ते संपूर्ण संशोधन देशातील लोकांनी देशात केले पाहिजे. युद्धानुसार त्याची गणना केल्यानंतर आम्ही त्यावर प्लस वन धोरणासह काम करू. सुदर्शन चक्राची एक खासियत अशी होती की, ते त्याच्या लक्ष्यापर्यंत पोहोचत असे आणि नंतर परत येत असे. आम्ही सुदर्शन चक्रासारख्या लक्ष्याच्या आधारे पुढे जाऊ.
पंतप्रधान मोदी म्हणाले की आज मी देशाला एका चिंता आणि आव्हानाबद्दल इशारा देऊ इच्छितो. एका षड्यंत्राखाली, एका सुनियोजित षड्यंत्राखाली, देशाची लोकसंख्या बदलली जात आहे. एका नवीन संकटाची बीजे पेरली जात आहेत. हे घुसखोर माझ्या देशातील तरुणांचे जीवनमान हिरावून घेत आहेत. हे घुसखोर माझ्या देशाच्या बहिणी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत. हे घुसखोर आदिवासींच्या घरात घुसून त्यांच्या जमिनीवर कब्जा करत आहेत. देश हे सहन करणार नाही. जेव्हा सीमावर्ती भागात लोकसंख्याशास्त्रात बदल होतो तेव्हा देशाची सुरक्षा धोक्यात येते. यामुळे सामाजिक तणावाचे बीज पेरले जाते. कोणताही देश आपला देश दुसऱ्यांच्या हाती देऊ शकत नाही. आपल्या पूर्वजांनी बलिदान आणि हौतात्म्याने स्वातंत्र्य मिळवले आहे. त्या महापुरुषांप्रती आपली जबाबदारी आहे की आपण हे होऊ देऊ नये. लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी सांगू इच्छितो की आपण एक उच्च शक्तीचे लोकसंख्याशास्त्र अभियान सुरू करत आहोत.
आपल्या दीर्घ भाषणात त्यांनी १४० करोड देशवासीयांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.आत्मनिर्भर म्हणजे केवळ आयात निर्यात नव्हे असे सांगताना नकळत डोनाल्ड ट्रम्फ यांच्या आयात शुल्क वाढीचा समाचार घेतला.
त्यांच्या उत्साहवर्धक भाषणातील महत्वाचे मुद्दे असे....
ऑपरेशन सिन्दुर म्हणजे आक्रोशाची अभिव्यक्ती होती.हिंदुस्तानचे पाणी फक्त आपलेच राहील. मेड इन इंडिया चीच सर्व उत्पादने आपल्याला वापरायची आहेत.सेमी कंडक्टर निर्मिती हे आपले महत्वाचे उद्दिष्ट असेल.गुलामी ने आपल्याला निर्धन बनवले होते.आता आपल्या आत्मसन्मानाची कसोटी आहे. दुसऱ्याच्या नशीबाची रेषा पुसण्यापेक्षा आपल्या नशिबाची (तकदीर) रेषा वाढवूया असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले तेंव्हा टाळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ध्वजारोहणापूर्वी त्यांनी राज घाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरव करताना सांगितले की जगातील ही सर्वात मोठी संघटना आता १०० वर्षांची झाली असून या संघटनेने राष्ट्र निर्माणाचे कार्य केले आहे. देशातील नारीशक्तीच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.
नया भारत सजावट.
श्रोत्यांमध्ये शुभ्र वेषधारी कॅडेटस नी भगव्या रंगात नया भारतअशी एक सजावट केली होती .ही सजावट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला इशारा देताना म्हंटले की अण्वस्त्रांची धमकी आम्हीं सहन करणार नाही.ऑपरेशन सिन्दुर मधील योध्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
.आपल्या दीर्घ भाषणात त्यांनी १४० करोड देशवासीयांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले.आत्मनिर्भर म्हणजे केवळ आयात निर्यात नव्हे असे सांगताना नकळत डोनाल्ड ट्रम्फ यांच्या आयात शुल्क वाढीचा समाचार घेतला.
त्यांच्या उत्साहवर्धक भाषणातील महत्वाचे मुद्दे असे.
ऑपरेशन सिन्दुर म्हणजे आक्रोशाची अभिव्यक्ती होती.हिंदुस्तानचे पाणी फक्त आपलेच राहील. मेड इन इंडिया चीच सर्व उत्पादने आपल्याला वापरायची आहेत.सेमी कंडक्टर निर्मिती हे आपले महत्वाचे उद्दिष्ट असेल.
गुलामी ने आपल्याला निर्धन बनवले होते.आता आपल्या आत्मसन्मानाची कसोटी आहे.
दुसऱ्याच्या नशीबाची रेषा पुसण्यापेक्षा आपल्या नशिबाची (तकदीर) रेषा वाढवूया असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले तेंव्हा टाळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
ध्वजारोहणापूर्वी त्यांनी राज घाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले.
आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गौरव करताना सांगितले की जगातील ही सर्वात मोठी संघटना आता १०० वर्षांची झाली असून या संघटनेने राष्ट्र निर्माणाचे कार्य केले आहे.
देशातील नारीशक्तीच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.
नया भारत सजावट.
श्रोत्यांमध्ये शुभ्र वेषधारी कॅडेटस नी भगव्या रंगात नया भारतअशी एक सजावट केली होती .ही सजावट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला इशारा देताना म्हंटले की अण्वस्त्रांची धमकी आम्हीं सहन करणार नाही.
ऑपरेशन सिन्दुर मधील योध्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
---------------------