Manipur: नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने (जेडीयू) बुधवारी मणिपूरच्या भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला. जेडीयू 2022 पासून राज्यात एनडीएचा भाग होता, दोन वर्षानंतर जेडीयूने सत्ताधारी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयूकडे राज्यात फक्त एकच आमदार आहे, जो आता विरोधी पक्षाचा भाग असेल. मणिपूरमध्ये एकूण 60 विधानसभा मतदारसंघ आहेत.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत जेडीयूने एकूण 6 जागा जिंकल्या होत्या. मात्र यानंतर एकामागून एक पाच आमदार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. केवळ मोहम्मद अब्दुल नासिर हे सध्या जेडीयूचा भाग आहेत, आता तेही विरोधकांमध्ये बसतील. सध्या भाजपचे राज्यात 37 आमदार आहेत. सरकारला नागा पीपल्स फ्रंट आणि राज्यातील अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. जेडीयूच्या या निर्णयाचा सरकारवर कोणताही परिणाम झालेला नाही.
--------------------------------------


