दुबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या ग्रुप स्टेजमध्ये आज सुपर संडे आहे. या स्पर्धेतील सर्वात मोठा सामना आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले होते. तर पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. जर आज पाकिस्तान हरला तर ते बाद फेरीतून जवळजवळ बाहेर पडेल.
२०१७ मध्ये झालेल्या शेवटच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ दोनदा आमनेसामने आले होते. भारताने गट फेरीत विजय मिळवला होता, तर अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताला १८० धावांनी हरवून बरोबरी साधली.
अर्थात हा सामना दुबईमध्ये खेळला जात आहे, पण पाकिस्तानचे लोक या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. टीम इंडियाचे चाहते पाकिस्तानमध्येही आहेत. त्यांना टीम इंडियाने हा सामना जिंकावा असे वाटते.
----------------------------------------

