कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड शहराजवळच्या वेदगंगा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. याला निढोरी बंधारा म्हणून ओळखले जाते.हा बंधारा या पद्धतीचा देशातील पहिला बंधारा आहे.मुरगूड चे पूर्व नगराध्यक्ष विश्वनाथराव पाटील यांच्या अधिपत्याखाली बंधारा बांधण्यात आला होता.त्याची देखभाल करण्याची जबाबदारी पाटबंधारे खात्याची असते.
तथापि या बंधाऱ्याची पाटबंधारे खात्या कडून म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. साखर कारखाना सुरू झाल्यावर मोठ्या प्रमाणात उसाची वाहतूक सुद्धा सुरू होते.
याशिवाय विद्यार्थी , व्यापारी, व्यावसायिक उद्योजक यांचीही सतत वाहतूक सुरु असते. या बंधाऱ्याला आता मोठी गळती लागली असून पाण्याचा साठा कमि होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या बंधाऱ्याची ताबडतोब दुरुस्ती होणे आवश्यक आहे .शिवाय त्या ठिकाणी बस्तवडे गावाजवळ वेदगंगेवर पूल आहे तसे पूल होणे आवश्यक आहे अशीही नागरिकांची मागणी आहे.
त्यामुळे वाहतूक व पाणी साठा अशा दोन्ही समस्या सुटू शकतील.नदीकाठचे शेतकरी व कुरणी,मुरगूड , चौंडाळ भडगाव मळगे बुद्रुक मळगे खुर्द या गावच्या नागरिकांची ही मागणी आहे. गळतीमुळे तर शेतकऱ्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे. या सर्वांच्या वतीने एक नियोजन पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने श्रीमती ज्योष्ना मोरबाळे व सागर गोळे यांनी निवेदन स्वीकारले.
सर्जेराव भाट,संग्राम ढेरे,रघुनाथ बोडके,सचिन मगदूम,संदीप ढेरे,विजय कांबळे, सात्ताप्पा मगदूम,संदीप मगदूम,वैभव ढेरे या प्रमुख नागरिकांसह चाळीस वर समस्या ग्रस्त नागरिकांच्या निवेदनावर सह्या आहेत.
------------------------------------