सांगली : राज्यातील बारावी पास मुलांचे कौतुक होत असताना सांगली जिल्ह्यातील एका विद्यार्थ्यांच्या निकालाची चांगलीच चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे बारावीच्या परीक्षेत केवळ पास होण्यापुरते म्हणजेच 35 टक्के गुण त्याला मिळाले आहेत. त्याने प्रत्येक विषयात 35 मार्क पाडत हा विक्रम केला आहे.
हेमंत किरण सटाले असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील कौठुळी येथील रहिवासी आहे. हेमंतने यंदाच्या बारावीच्या परीक्षेत प्रत्येक विषयात काठावर पास होण्यापुरते म्हणजेच केवळ 35 मार्क मिळवले आहेत. यामुळे त्यांची गावभर चर्चा सुरू झाली आहे. हेमंत हा व्यावसायिक अभ्यासक्रमातील टेक्नॉलॉजी विभागाचा विद्यार्थी असून त्याने इंग्रजी, मराठी, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन, ट्रेड थिअरी आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल्स या विषयांचा पेपर दिला होता.
--------------------------------