कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मोबाईलचा अतिवापर टाळण्यासाठी एक दिवस मोबाईल उपवास करूया असे आवाहन नामवंत साहित्यिक राजन गवस यांनी केले.
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या वाटपाचा कार्यक्रम लेखक राजन गवस यांच्या हस्ते, आमदार जयंत आसगांवकर, ऋतुराज पाटील आणि सतेज पाटील यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी ते बोलत होते .
आत्ताच्या पिढीमध्ये मोबाईलमुळे मुलांची सहनशक्ती नष्ट होऊन अपयश पचवण्याची त्यांची ताकद लोप पावली आहे. त्यामुळे मोबाईलच्या दुष्परिणामांची जनजागृती करण्याचा संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करूया आणि येणाऱ्या पिढीला वाचवूया असे प्रतिपादन सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना केले .
यावेळी जिल्हा बँकच्या संचालिका स्मिता गवळी, गोकुळचे बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, शशिकांत पाटील- चुयेकर, माजी नगरसेवक राजू लाटकर, राहुल माने, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, भोपाळ शेटे, माजी महापौर मनीषा बुचडे, सुलोचना नायकवडे, नंदू सूर्यवंशी, विनायक फाळके, भारती पवार, तौफिक मुल्लाणी, दिपाली घाटगे, वैभवी जरग, बाजार समितीचे भरत पाटील- चुयेकर, सुयोग वाडकर, विलास साठे, युवराज गवळी, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर.एस. कांबळे, विनायक घोरपडे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित होते.
--------------------------------