कोल्हापूर न्यूज नेटवर्क
निपाणीचे माजी आमदार स्व. काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघाचे तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. सामान्य कुटुंबांच्या वेदना काय असतात त्यांना चांगल्या माहीत होत्या. त्यांनी आयुष्यभर संघर्ष करून लोकांना न्याय मिळवून दिला ते सर्वसामान्यांचे आधारस्तंभ होते. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कायमस्वरूपी कामे केली असली तरी त्यांची काही कामे अपूर्ण राहिली आहेत. ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचे आश्वासन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले.
कै. काकासाहेब पाटील यांच्या निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी निपाणीतील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री जारकीहोळी म्हणाले , काकासाहेब पाटील यांनी निपाणी मतदारसंघ अबाधित ठेवणे आणि काळम्मावाडी पाणी करारासह अनेक शाश्वत विकास कामे केली आहेत. त्यांच्या कामामुळे नागरिकांनी त्यांना जिल्हा पंचायत सदस्यांपासून आमदारांपर्यंत पदे दिली. त्यांनी धारवाड-निपाणी-कराड रेल्वे मार्गासाठी कठोर परिश्रम केले. पण त्यांचे हे महत्त्वाचे स्वप्न अद्याप पूर्ण झालेले नाही. ते साकार करण्यासाठी आम्ही सर्व नेत्यांच्या सहकार्याने प्रयत्न करू. विविध क्षेत्रात सामान्य लोकांच्या समस्या सोडवल्यामुळेच सामान्य लोकांमध्ये त्यांचे स्थान होते. कोणत्याही कामात घाई न करता त्यांनी चपळता आणि हुशारीने मतदारसंघाचा विकास केला. येणाऱ्या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या अपूर्ण स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काम करत राहावे.
विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी साधा राजकारणी कसा असावा हे दाखवून दिले आहे. तीन वेळा विधानसभेवर निवडून येऊनही त्यांनी एका सामान्य कार्यकर्त्यासारखे काम केले. त्यांनी काँग्रेस पक्षाला बळकट केले आहे. कार्यकर्त्यांनी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अथक परिश्रम करावेत.
शोकसभे वेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, अण्णासाहेब हावळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, प्रा. शिवाजी मोरे, पंकजा पाटील, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे, राजेंद्र वड्डर, नगरसेवक विलास गाडीवड्डर, राजेंद्र ना. गाडीवड्डर, राजू चव्हाण, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे राजू पाेवार , किसन दवणे, सी.ए. खराडे, प्रा. सुरेश कांबळे, संभाजी तोरवट, सुमित्रा उगले, कबीर वराळे आदींनी काकासाहेब पाटील यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला.
यावेळी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकू पाटील, सभापती डॉ. जसराज गिरे, संकेश्वरच्या माजी नगराध्यक्षा श्रीकांत हातनूर, चंद्रकांत जासूद, शंकरदादा पाटील, सुंदर पाटील, गोपाळ नाईक, बाबुराव खोत, नगरसेवक संजय सांगावकर, आ. संजय चव्हाण, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, नगरसेविका शांता सावंत, बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, विजय शेटके, अण्णासाहेब तांदळे, नगरसेवक अरुण आवळेकर, संजय चव्हाण, विनोद बळ्ळारी, रवींद्र श्रीखंडे, महिला ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा वर्षा चव्हाण, अनिता पठाडे, शांती सावंत, प्राचार्या स्नेहा घाटगे,अनिता पठाडे, अशोककुमार पाटील, राजकुमार पाटील रामा निकम व विविध पक्षांचे कार्यकर्ते, निपाणी मतदारसंघातील नागरिक, महिला उपस्थित होत्या.
-------------------------



