कोल्हापूर न्यूज नेटवर्क
21 व्या शतकातील स्त्रिया कणखर बनत असून समाजाच्या प्रगतीमध्ये महिलांचा वाटा मोठा आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब यांनी केले .ते महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण जि सिंधुदुर्ग येथे आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कोल्हापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी डॉ . मीना शेंडकर या होत्या समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे हे अध्यक्षस्थानी होते . बॅ नाथ पै सेवांगण सभागृहामध्ये हा कार्यक्रम झाला .
या वेळी बोलताना जयप्रकाश परब पुढे म्हणाले की 'शिक्षणपासून सामाजिक क्षेत्रापर्यंत स्त्रियांनी प्रगती साधली आहे पण त्यांच्या स्वप्नांना बळ देणे हे कुटुंब व समाजाचे कर्तव्य आहे .
प्रमुख पाहुण्या डॉ . मीना शेंडकर म्हणाल्या की , महिला ही आई ,बहीण , पत्नी व सखी अशा अनेक रूपामध्ये आपल्या कुटुंबाला घरपण देत असते . व सामाजिक प्रगतीमध्येही योगदान देत असते .तरीही आज तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते . स्रियांना समान संधी ,सुरक्षितता आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अधिक भागीदारी मिळणे आवश्यक आहे .त्या दृष्टीने खाजगी शिक्षक सेवक समितीने महिलांसाठी निसर्गरम्य कोकणात येऊन घेतलेला मेळावा त्याना प्रेरित करण्यासाठी पोषक ठरला आहे.
.अध्यक्षपदावर बोलताना भरत रसाळे म्हणाले की . आमच्या महिला जिल्हा शाखेच्या वतीने व्याख्यान , सांस्कृतिक कलाभिनय व फनी गेम्स असा आयोजित केलेला हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक आहे भविष्यकाळात दिल्लीमध्ये असा जागतिक महिला दिन साजरा करण्याचा आमच्या संघटनेचा मानस आहे .यावेळी समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी कोंडेकर संपादित "स्वरकंठी "या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते झाले .या कार्यक्रमाचे स्वागत शहराध्यक्षा चारुलता पाटील यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा सविता गिरी यांनी केले . यावेळी राकेश परब , केशव भोसले ,नेहा गवंडे व कुणाल अंगणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने सर्व महिलांचे जंगी स्वागत केले .
आभार सारिका पाटील यांनी मांनले तर सूत्रसंचालन अमृता ऐतवडे यांनी .केले यावेळी महिलां शाखेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला . सांस्कृतिक व वैयक्तिक स्पर्धेमधील विजेत्याना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .या महिला मेळाव्यासाठी बांदा , वेंगुर्ले, मालवण , देवगड ते वैभववाडी पासून आजरा ,गडहिंग्लज राधानगरी , भुदरगड कागल जयसिंगपूर ,इचलकरंजी , पन्हाळा व कोल्हापूर येथील महिलांनी सहभाग घेतलेला होता . वर्षा वायदंडे , रोहिणी एडगे , माणिक सपाटे ,विद्या पाटील ,सुनिता डावरे पद्मा सुतार ,भारती पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हा मेळावा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले तर शिवाजी भोसले , महादेव डावरे , कुमार पाटील , अमित परिट , आप्पासाहेब वागरे यांचे मार्गदर्शन लाभले .
---------------------------------------



