कोल्हापूर न्यूज नेटवर्क
पावसाळ्यानंतर तलावातील पाण्याचा साठा कमि होईल तसे दूषित व गढूळ पाणी येऊ लागते.मुरगूड नगर परिषदेच्या जलशुध्दीकरण केंद्राकडील टाक्या स्वच्छ करण्याची वेळ आली.
तीस फूट उंचीवरील टाक्या स्वच्छ करणे हे आव्हानात्मक काम होते.कुशल कामगारांना स्वच्छतेचे कंत्राट देण्याची पद्धत असते . ती फार खर्चिक असते.
त्यामुळे कांहीं शिवभक्त स्वयंसेवकांना सोबत घेऊन व जीवावर बेतुन नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी टाक्यांच्या सफाईचे काम केले.
कसलाही मोबदला न घेता कर्मचारी व स्वयंसेवकांनी केलेल्या या सेवेचे कौतुक होत आहे. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------------------------------------

