कोल्हापूर न्यूज नेटवर्क
१० वी ,१२वी तील आजचे उत्तम यश म्हणजे तुमच्या उज्वल भविष्याची भक्कम पायाभरणी आहे असे उद्गार भागीरथी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.अरुंधती महाडिक यांनी काढले.
मुरगूड येथील पै.बाळासाहेब दादासाहेब जमादार सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुण गौरव समारंभात त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी सौ.मंजुषाताई रणजितसिंह पाटील या होत्या.
सौ.महाडिक पुढे म्हणाल्या की यासाठी केवळ परीक्षेतील यश पुरेसे नाही तर ध्येयासाठी दृढनिश्चय सुद्धा आवशक आहे.भव्यतम भविष्यासाठी तुम्हीं आता स्वतःला सिद्ध केले आहे.तुमचा गौरव करण्यासाठी जमादार कुटुंबीय व सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या या समारंभाचे कौतुक केले पाहिजे.
या समारंभात शहरातील १०वी,१२वी परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा ,शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.याशिवाय को जिमाशी संस्थेचे नूतन अध्यक्ष संजय शिंदे,शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बी.एस .खामकर , शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी नंदिनी साळोखे, विविध सामाजिक क्षेत्रातील सेवाभावी व्यक्ती,प्रशिक्षणार्थी मल्ल यांचाही सत्कार करण्यात आला.
माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी प्रास्ताविक केले.
स्व.विश्वनाथराव पाटील खुल्या नाट्यगृहात संपन्न झालेल्या या समारंभासाठी उपस्थित मान्यवर पुढील प्रमाणे.
प्राचार्या जस्मिन जमादार, रुपा सणगर,गौराबाई सोनुले,माया चौगुले,पी एस आय वाकळे मॅडम,फुलाबाई कांबळे,वसुधा कुंभार,शोभा परीट, वर्षाराणी मेंडके, वैशाली सुतार,आदिती सूर्यवंशी, प्राचार्य, एस . पी. पाटील, प्राचार्य व्हि.आर. भोसले,विशाल सूर्यवंशी, प्रा.एम बी. खाटांगळे, सत्कारमूर्ती, पालक, शुभचिंतक, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक .
सूत्रसंचालन प्रा.अनिल पाटील यांनी केले.अमर सणगर यांनी आभार मानले.
-----------------------------